आपल्या जगण्याची, आपल्या आतली, आपली अशी एक मुळातली लय असणार......
प्रत्येकाची वेगवेगळी.
घड्याळाच्या काट्याशी बांधलेलं आयुष्य नको. तब्येतीत जगूया.
जिथे रेंगाळावं वाटलं तिथे रेंगाळायचं, जिथून घाईने निघावसं वाटेल तिथे फार थांबायचं नाही.
जे काही शोधावं वाटेल ते शोधायला जायचं...
मुख्य म्हणजे विचार करायचा.
त्याची संगती लावायची.
कोणी म्हंटलं विचार करणं थांबव, तर ते काही शक्य नाही.
चार लोकांना नाही पडत असे प्रश्न पडले तरी त्यांच्यामागे जायचं.
सुसंगतीच्या मागे धडपडताना विसंगतीच ठळक होत जाते.
त्याचेही नियम शोधायचे.
मजा येते.
स्वत:च्या आत रमायचं असेल तर आजूबाजूला शांतता हवी.
जगण्याचा वेग कमी हवा.
स्वत:साठी वेळ हवा.
काय करायचं?
पहिल्यांदा जगासाठीची दारं बंद करायची.
खिडक्या उघड्या ठेवायच्या. त्याही हव्या तितक्याच.
टीव्ही बंद. चॅनेल्स बंद. माहितीचा सततचा ओघ थांबवायचा. वर्तमानपत्र पुरेत.
लॅन्डलाईन पुरेशी आहे. मोबाईल बंद.
मेल्स पुरेशा आहेत, फेसबुक, व्हॉटसअप बंद.
माणसं आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन गप्पा मारून गेली.
त्यांचा आपल्या आयुष्यातला सहभाग तेवढाच ठरलेला होता.
नाहीतर जोडून राहिली असती, तशी राहिलेली काही आहेतच की!
जुन्या माणसांना नव्याने शोधायला नको, ती स्वत:हून आली तरी नकोत.
नव्या अनोळखी माणसांशी तर ओळखच करून घ्यायला नको.
अशी माणसं आपला वेळ कुरतडत बसतात,
सावध राहून त्यांना थांबवायचं.
बरीचशी माणसं ’हाय-हॅलो’ पुरतीच असतात.
मर्यादा घालून द्यायची.
शेवटी हे आपलं आयुष्य आहे.
माझं आयुष्य आहे.
काळ तर असा आला आहे की रेडिओवरचे निवेदक देखील मैत्री असल्यासारखे गळ्यात पडायला लागतात.
रेडिओ बंद करायचा.
शहरभर विखुरलेल्या, उन्हा- वार्या - पावसात उभ्या असलेल्या फलकांवरील जाहिरातीतील आकर्षक हसर्या स्त्रियांना आणि पुरूषांना एका दृष्टीक्षेपात बाजूला सारायचं.
त्वचेवरील रंध्र नि रंध्र दाखवू शकणार्या फोटोग्राफीमुळे अचंबित व्हायचं.
शहराच्या विद्रुपीकरणाची काळजी करायची आणि
माणसाची नस पकडू पाहण्यार्या जाहिराती ज्यांच्यासाठी बनवल्या आहेत त्या माणसांच्या मानसीकतेचा विचार करायचा असला तर तो डोळे मिटून करायचा.
आपल्या लयीत पुस्तके बसतात..... निवान्त वाचायची.
माणसांशी समोरासमोर गप्पा माराव्याशा वाटल्या तर मारायच्य़ा,
त्यांची लढाई समजून घ्यायची.
तात्पर्य काय? आपली आपली स्वत:ची आतली लय शोधून काढायची,
त्या लयीत जगायचं.
ना त्याहून संथ ना त्याहून वेगात.
अशा तारा जुळल्या की त्यातून आपलं आपलं असं संगीत तयार होईल.
त्या तालावर थिरकता येईल.
समही गाठता येईल.
******
प्रत्येकाची वेगवेगळी.
घड्याळाच्या काट्याशी बांधलेलं आयुष्य नको. तब्येतीत जगूया.
जिथे रेंगाळावं वाटलं तिथे रेंगाळायचं, जिथून घाईने निघावसं वाटेल तिथे फार थांबायचं नाही.
जे काही शोधावं वाटेल ते शोधायला जायचं...
मुख्य म्हणजे विचार करायचा.
त्याची संगती लावायची.
कोणी म्हंटलं विचार करणं थांबव, तर ते काही शक्य नाही.
चार लोकांना नाही पडत असे प्रश्न पडले तरी त्यांच्यामागे जायचं.
सुसंगतीच्या मागे धडपडताना विसंगतीच ठळक होत जाते.
त्याचेही नियम शोधायचे.
मजा येते.
स्वत:च्या आत रमायचं असेल तर आजूबाजूला शांतता हवी.
जगण्याचा वेग कमी हवा.
स्वत:साठी वेळ हवा.
काय करायचं?
पहिल्यांदा जगासाठीची दारं बंद करायची.
खिडक्या उघड्या ठेवायच्या. त्याही हव्या तितक्याच.
टीव्ही बंद. चॅनेल्स बंद. माहितीचा सततचा ओघ थांबवायचा. वर्तमानपत्र पुरेत.
लॅन्डलाईन पुरेशी आहे. मोबाईल बंद.
मेल्स पुरेशा आहेत, फेसबुक, व्हॉटसअप बंद.
माणसं आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन गप्पा मारून गेली.
त्यांचा आपल्या आयुष्यातला सहभाग तेवढाच ठरलेला होता.
नाहीतर जोडून राहिली असती, तशी राहिलेली काही आहेतच की!
जुन्या माणसांना नव्याने शोधायला नको, ती स्वत:हून आली तरी नकोत.
नव्या अनोळखी माणसांशी तर ओळखच करून घ्यायला नको.
अशी माणसं आपला वेळ कुरतडत बसतात,
सावध राहून त्यांना थांबवायचं.
बरीचशी माणसं ’हाय-हॅलो’ पुरतीच असतात.
मर्यादा घालून द्यायची.
शेवटी हे आपलं आयुष्य आहे.
माझं आयुष्य आहे.
काळ तर असा आला आहे की रेडिओवरचे निवेदक देखील मैत्री असल्यासारखे गळ्यात पडायला लागतात.
रेडिओ बंद करायचा.
शहरभर विखुरलेल्या, उन्हा- वार्या - पावसात उभ्या असलेल्या फलकांवरील जाहिरातीतील आकर्षक हसर्या स्त्रियांना आणि पुरूषांना एका दृष्टीक्षेपात बाजूला सारायचं.
त्वचेवरील रंध्र नि रंध्र दाखवू शकणार्या फोटोग्राफीमुळे अचंबित व्हायचं.
शहराच्या विद्रुपीकरणाची काळजी करायची आणि
माणसाची नस पकडू पाहण्यार्या जाहिराती ज्यांच्यासाठी बनवल्या आहेत त्या माणसांच्या मानसीकतेचा विचार करायचा असला तर तो डोळे मिटून करायचा.
आपल्या लयीत पुस्तके बसतात..... निवान्त वाचायची.
माणसांशी समोरासमोर गप्पा माराव्याशा वाटल्या तर मारायच्य़ा,
त्यांची लढाई समजून घ्यायची.
तात्पर्य काय? आपली आपली स्वत:ची आतली लय शोधून काढायची,
त्या लयीत जगायचं.
ना त्याहून संथ ना त्याहून वेगात.
अशा तारा जुळल्या की त्यातून आपलं आपलं असं संगीत तयार होईल.
त्या तालावर थिरकता येईल.
समही गाठता येईल.
******
अंतर्यामी सूर गवसला
ReplyDelete>> आपली आपली स्वत:ची आतली लय शोधून काढायची,
ReplyDeleteत्या लयीत जगायचं.
ना त्याहून संथ ना त्याहून वेगात..
वा!
खरच आहे. असं लयीत राहता आलं शांत, समाधानी नक्कीच होता येईल.
ReplyDelete